आधीचा तो मी....
कधी गवसेल का पुन्हा
मला....?
श्यामळू आणि एकलकोंडा....
तसाच परत मिळेल का मी
मला....?
स्वप्नांच्या दुनियेत
हरवलेला....
मी माझ्याचपासून
दुरावलेला....
मी कोणत्या विश्वात गेलेला....
मिळेल का पुन्हा मला....?
एकटाच गेलो अनंताहुनी
दूर....
एकट्याचे गाणे, एकटेच
सूर....
पूर्वीचा तो मी अवखळ आणिक
खट्याळ,
अनंतातल्या ताऱ्यासारखा
स्वच्छंदी, आईचा तो बाळ....
फुलपाखरांमागे फिरणारा,
मृगांच्या थेंबांचा तो रसिक
कधी गवसेल का पुन्हा....?
बद्कांमधला तो राजहंस ओळखेल
का स्वतःला....?
अस्तित्व स्वतःचं कधी
निर्माण करता येईल का त्याला...?
आकाशाच वेड लागलच जर
त्याला....
घराची आठवण येईल का त्या
पाखराला....?
आधीचा तो मी....
कधी गवसेल का पुन्हा
मला....?
1no
ReplyDeleteअगदी बरोबर.... पुवींचे दिवस परत जगता आले असते तर आज जीवन खुप वेगळ असत........:-)
ReplyDelete:) Nakkich
ReplyDelete